spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive, संजय राऊतांना सकाळी उठून काही कामधंदे नाहीत, मोहित कंबोज

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल होईल असे सर्वात आधी ज्यांनी भाकीत केले होते ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची अयोध्येमध्ये टाईम महाराष्ट्र सोबत बोलत असताना त्यांनी विरोधकांना रोकठोक उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल होईल असे सर्वात आधी ज्यांनी भाकीत केले होते ते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची अयोध्येमध्ये टाईम महाराष्ट्र सोबत बोलत असताना त्यांनी विरोधकांना रोकठोक उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेवर मोहित कंबोज म्हणाले की, रावण राज्याचा अंत करून रामल्लाच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आले आहे आहेत असे हे वाक्य आणि आदित्य ठाकरे यांना हिंदी वाक्य बोलताना गडबड झाली असावी असे मोहित कंबोज म्हणाले. एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेता आहेत कारण आज त्यांनी सर्वाना सोबत दर्शन करण्यासाठी घेऊन आले आहेत. उद्धव ठाकरे हे खूप छोट्या मनाचे नेता आहेत परंतु एकनाथ शिंदे हे स्वतः च्या पक्षातले सर्व शिवसैनिकांना तर घेऊन आलेच पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा घेऊन आले आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा स्वःत च्या पक्षातले नेते जेव्हा दर्शन करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी त्या नेत्यांना रथावरून उतरवले होते असे मोहित कंबोज म्हणाले.

पुढे मोहित कंबोज म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः च्या पक्षातल्या आमदारांना सुद्धा दर्शन करण्यासाठी नेले नव्हते परंतु एकनाथ शिंदे हे तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा दर्शनासाठी नेत आहेत. हिंदू धर्माला कसे पुढे न्यायचे आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारला पुढे नेण्याचे काम हे एकनाथ शिंदे करत आहेत मी त्यांचे धन्यवाद करतो असे मोहित कंबोज म्हणाले. आज अयोध्येला येऊन एक सकारात्मक ऊर्जा जी मिळते तीच सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या राज्यामध्ये त्याच ऊर्जेने काम करणे , लोकांच्या समस्या दूर करणे जेवढे सगळे नेते इथे आले आहेत ते सगळे सकारात्मक ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्या दूर करून, कसे महाराष्ट्राला पुढे नेता येईल, सगळ्यांना कसे सोबत घेऊन जाता येईल आणि आज जे एकनाथ शिंदे यांनी जे काम केले आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो असे मोहित कंबोज म्हणाले.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मोहित कंबोज म्हणाले की, बरोबर व्यक्तीच्या हातामध्ये पक्ष आला आहे आणि त्यांना त्यांचे महत्व माहिती आहे आणि ते त्यांच्यासोबत न्याय करतील. जे अडीच वर्षांमध्ये धोकेबाजीचे चोरीचे सरकार बनवले होते ते सरकार आता संपले आहे आता पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाची परंपरा जपत आहेत कारण आपण वेस्टर्न परंपरेकडे गेलो होतो. मोदी आता स्वःत चे पुतळे बनवत नाही ते सनातन हिंदू धर्माला भव्य रूपामध्ये आणत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आपले मूळ परंपरा विसरले आहेत. असे मोहित कंबोज म्हणाले. संजय राऊत यांना सकाळी उठून काही कामधंदे नाहीत बिचारा फ्रस्टेड माणूस आहेत त्यांचा धंदा बंद झालेला आहे त्यांच्याकडे काही राहिले नाही त्यांना आता सगळं सोडलं पाहिजे संजय राऊत यांना संजय यांच्या परिस्थिती मध्ये सोडले पाहिजे त्यांना कसे लाइमलाइट मध्ये राहता येईल, संजय राऊत यांचे वसुलीचे धंदे बंद झाले आहेत.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss