काही मिनिटांमध्येच शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनाची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी जिल्ह्यात दुर्गम ठिकाणी चालणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायांची ठिकाणे उध्वस्त केली आहेत.

काही मिनिटांमध्येच शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनाची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी जिल्ह्यात दुर्गम ठिकाणी चालणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायांची ठिकाणे उध्वस्त केली आहेत. नाशिक जिल्ह्यात अवैध व्यवसाय (Illegal Business) बोकाळले असून काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik Rural Police) सातत्याने धडक कारवाई केली जात आहे. मात्र तरीदेखील अनेकजण छुप्या पद्धतीने मद्यविक्री किंवा इतर अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी थेट शेतकरी हेल्पलाईनचा (Helpline Number) पर्याय निवडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनेक कामांसाठी पोलीस ठाण्यात आणि इतर कार्यालयामध्ये जावे लागते. बऱ्याचदा आपले काम नक्की कोणाकडे प्रलंबित आहे. याची माहिती देखील त्यांना मिळत नाही. त्याचप्रमाणे अशा हातभट्ट्यांना कच्चामाल पुरवणाऱ्या पुरवठादारांवर देखील मोठ्या कारवाया केल्या आहेत. याच अवैध व्यवसायांचे विरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी यापूर्वी ६२६२ (७६) ६३६३ ही ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली होती. सदर हेल्पलाईनचे माध्यमातून अनेक जागरूक नागरिकांनी आपापल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीसांना दिली होती. सदर हेल्पलाईनमुळे ग्रामीण पोलीसांना अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोठी मदत झाली होती. यावेळी मा. मंत्री महोदयांनी ‘बळीराजा’ हेल्पलाईनवर पहिला कॉल करून ते शेतकरी बोलत असल्याचे सांगितले, त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन जिल्हयातील शेतक-यांच्या समस्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना व्यक्त करून सदर कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिकसह जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना देखील वारंवार घडत असतात. अशावेळी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागत असते. मात्र आता बळीराजा हेल्पलाइनच्या माध्यमातून चांगला पर्याय असणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बळीराजाला फसवणुकीपासून परावृत्त करण्यासाठी हेल्पलाईन महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतक-यांच्या समस्या सोडवणुकीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध असून, शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारी सदर हेल्पलाईनचे माध्यमातून मोकळेपणाने मांडाव्यात असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

लाल किल्यावरील भाषणादरम्यान मोदींनी मांडले महत्वाचे मुद्दे

मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत घातला गोंधळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version