राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, थेट जनतेतून सरपंचाची निवड

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख अखेर जाहीर, थेट जनतेतून सरपंचाची निवड

राज्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या महिन्यातील १३ ऑक्टोबर रोजी एकूण १८ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होतील. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकांबाबत राज्यातील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्यातल्या एकूण १,११६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका आहेत. ही घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. जाहीर करण्यात आलेल्या या कार्यक्रमानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली असून, १४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

बिग बी-रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर प्रदर्शित

कार्यक्रमाचे स्वरूप अशा पद्धतीचे असेल :

संबंधित तालुक्यातील तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, २४आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडणार आहे. तर, ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान १३ ऑक्टोबर २०२२रोजी सकाळी ७,३० ते सायंकाळी ५,३० वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुका होणार असल्याने सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे.

सैफ अली खान विक्रम वेधा चित्रपटाच्या ट्रेलर पूर्वावलोकन दिसला

रायगड: अलिबाग- ३, कर्जत २ , खालापूर ४, पनवेल १, पेण १, पोलादपूर ४ , महाड १ , माणगाव- ३ व श्रीवर्धन- १.ठाणे: कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ४, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०रत्नागिरी: मंडणगड- २, दापोली- ४ खेड- ७ , चिपळूण१ गुहागर ५, संगमेश्वर ३ , रत्नागिरी ४ , लांजा- १५व राजापूर- १०
सिंधुदुर्ग: दोडामार्ग- २ व देवडगड- २
नाशिक: इगतपुरी ५ , सुरगाणा- ६१ , त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ ७१ .
नंदुरबार: अक्कलकुवा ४५ , अक्राणी- २५ , तळोदा- ५५ व नवापूर- ८१ .
पुणे: मुळशी- १ व मावळ १ .
सातारा: जावळी ५ , पाटण- ५ व महाबळेश्वर- ६
कोल्हापूर: भुदरगड- १ , राधानगरी- १ आजरा- १ व चंदगड १
अमरावती: चिखलदरा- १
वाशीम: वाशीम- १
नागपूर: रामटेक ३ , भिवापूर- ६ व कुही- ८
वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७
चंद्रपूर: भद्रवाती- २ , चिमूर ४ , मूल ३ , जिवती- २९ , कोरपणा- २५ , राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १ .
भंडारा: तुमसर- १ भंडारा- १६ , पवणी- २ व साकोली- १
गोंदिया: देवरी- १ , गोरेगाव- १ गोंदिया- १ , सडक अर्जुनी १ अर्जुनी मोर- २ .
गडचिरोली: चामोर्शी२ , आहेरी२ , धानोरा६ , भामरागड- ४ , देसाईगंज २ , आरमोरी२ , एटापल्ली- २ व गडचिरोली १

हेही वाचा : 

विजेच्या कडकडाटासह रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

Exit mobile version