Gulabarao Patil : आदित्यलाही मुलं होतील, मग? : मंत्री गुलाबराव पाटील

दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे (Udhhav Thakceray) यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आहे, आणि चुकीचे असल्याचे आणि राजकारणाची (Politics) पातळी इतक्या खाली जाऊ नये अशा प्रकारची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Gulabarao Patil : आदित्यलाही मुलं होतील, मग? : मंत्री गुलाबराव पाटील

दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे (Udhhav Thakceray) यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आहे, आणि चुकीचे असल्याचे आणि राजकारणाची (Politics) पातळी इतक्या खाली जाऊ नये अशा प्रकारची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे अतिशय चुकीचे असून उद्या आदित्य ठाकरे याना ही मूलबाळ होणार आहे, त्यांनी अशी टीका करायला नको होती, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

सध्या सेनेच्या दोन गटात धनुष्यबाण चिन्ह कोणाचे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र, खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांची संख्या बळाचा विचार करता धनुष्य आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. धनुष्यबाण लोकप्रतिनिधींची संख्या, खासदारांची संख्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या या तिघांच्या आकडेवारीवर ठरणार आहे. शिवाय कालचा दसरा मेळाव्यातील गार्ड सर्वकाही सांगून जाते. शिंदे सरकारला, आम्हाला पाठींबा देणाऱ्या जनरल लोकांची संख्या सिद्ध करून देते की धनुष्यबाण कोणाला मिळणार. संख्येचा आधार, लोकसंख्येचा आधार, लोकप्रतिनिधी आणि जनतेचा पाठिंबा या तिघा गोष्टींकडे नजर मारली तर धनुष्यबाण आम्हाला मिळाला पाहिजे, अशी ठोस भूमिका मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यंदा प्रथमच मुंबईत (Mumbai) दोन दसरा मेळावे (Dasara Melava) जनतेने याची देही याची डोळा अनुभवले. दरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सर्वावर सडकून टीका केली. यावेळी एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) बोलताना म्हणाले कि, बाप, मुलगा आता नातूही राजकारणात अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या सोबत ३५ वर्षे जवळ राहिलोय पण उद्धव साहेब घसरताना मी पाहिले नाही. त्यांच्यासारख्याअभ्यासू माणसांनी एक छोट्याशा दीड वर्षाच्या बाळावर अशी टीका करावी, हे चुकीचं आहे. आदित्यलाही मुलं होतील, मग? राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सहभागी झालो, त्याच्यावर काहीच म्हणणं नव्हतं. ज्यावेळेस आम्ही सूचना केल्या की आता होका यंत्र चालू झाला आहे, आता हवामानाचा अंदाज बदलला आहे. सोसाट्याचा वारा येणार आहे, पाऊस पडणार आहे. हे माहीत असूनही सुद्धा आपण जर निर्णय बदलत नसाल तर मला तरी असं वाटते की राजकीय क्षेत्रामध्ये सध्या जगामध्ये आणि देशांमध्ये हे मान्य केलं आहे. सार्वभौम निर्णय घेण्याची पार्टी चालेल. एकतर्फी निर्णय घेणारी पार्टी चालणार नाही. जिथे सर्व सार्वजनिक निर्णय घेतला जातील, कमिटी निर्णय घेईल असेच पक्ष तरतील, असे मोलाचा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिला.

हे ही वाचा:

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीचा आजपासून थरार, दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

NCB ची मोठी कारवाई! NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; १२० कोटींचं मेफेड्रोन जप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version