“वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, दसरा मेळाव्यावरून मनसेने लगावला टोला

शिवसेनमधून एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे बंड करून निघून गेले आणि भाजप सोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट असे दोन गट तयार झाले. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट या वर्षीच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहेदिसून येत आहे.

“वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, दसरा मेळाव्यावरून मनसेने लगावला टोला

शिवसेनमधून एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे बंड करून निघून गेले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट असे दोन गट तयार झाले. शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट या वर्षीच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे .

एकनाथ शिंदेचा शिंदे गट तर उद्धव ठाकरेंचा शिवसेना अश्या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली आहे. शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी जबदस्त टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यावं असा टोला मनसेने लगावला आहे.

शिवसेनेची ओळख म्हणून दसरा मेळवाकडे बघितले जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. शिवाय शिवसेनेची राजकीय भूमिका या दसरा मेळाव्यातून अधिक स्पष्ट होते. त्याशिवाय भविष्यातील वाटचालीबाबतही भाष्य केले जाते. परंतु याच दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच हि सुरु आहे. तसेच हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नक्की कोण घेणार या कडे देखील सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंतु याच गोष्टीची संधी साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेना आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी केलेले ट्विट –
‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी देखील आणि शिंदे गटावर टीका केली होती. माझ्याकडे काहीही नसले तरी विचार आहेत. वारसा हा वास्तूंचा नसतो तर विचारांचा असतो असे सांगत बाळासाहेबांचे विचार आपल्यासोबत असल्याचे राज यांनी सांगितले होते.

हे ही वाचा :- 

शिंदे गटांकडून बीएमसी निवडणुकीसाठी नवीन शिलेदारांची निवड

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version