समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा- शरद पवारांचे महिलांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार (Sharad Pawar NCP) महिला मेळावा (NCP Mahila Melava) आज मुंबई मध्ये पार पडला.

समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा- शरद पवारांचे महिलांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार (Sharad Pawar NCP) महिला मेळावा (NCP Mahila Melava) आज मुंबई मध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, (Rohini Khadse) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या मेळाव्यात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांना अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो ‘ असे शरद पवार म्हणाले आहेत.

या मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले ‘ अनेक तास बसून देखील कोणी सभागृहाच्या बाहेर गेल नाही. सर्वानी संघटनात्मक कामाची भूमिका मांडली आहे आणि ऐकून देखील घेतली आहे. आपल्याला काही कार्यक्रम हाती घाययचे आहेत यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता.आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झालं की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळं आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो. आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणं योग्य नाही. असं होतं असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही.

 सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत हे योग्य नाही. सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते, परंतु कंत्राटी पदावर नेमलं तर तिथं आरक्षण नाही त्यामुळं मला खात्री आहे तिथं महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की १ जानेवारी पासून १ मे पर्यंत किती महिला बेपत्ता आहेत? याचं उत्तर मिळालं की १९ हजार ५५३ महिला बेपत्ता आहेत. याचं रेकॉर्ड देखील आहे.

हे ही वाचा: 

“त्यांनी” महाराष्ट्राचा जीव घेतला- आशिष शेलार

माझ्या गाडीत आणि कार्यक्रमात महिलांना प्राधान्य- राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version