सध्या महाराष्ट्रामध्ये दररोज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करतांना दिसत आहे. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांचा मान मिळेल असं वाटलं होतं. पण त्यांचा अपमान करण्यात आला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे का? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं? याचा दोन दिवसात खुलासा करणार आहे, असा इशाराच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला आहे.
संजय राऊतांच्या भारत जोडो यात्रेला सुद्धा दिपक केसरकर यांनी जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थानवर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस (Congress) विरोध करत होती, त्यांना काश्मीरमध्ये जाऊन भेटणं एवढा मोठा अपमान बाळासाहेब ठाकरेंचा कुणीही केला नाही तो संजय राऊतांनी केला असं मला वाटतं. त्यामुळेच जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही”, असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.
शिवसेनेत आम्ही बंड केलं. त्यानंतर आम्ही कुठेही जायचो तेव्हा गोमूत्र (cow urine) टाकून ती जागा स्वच्छता केली जायची. आता त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यावर गोमूत्र टाकून स्वच्छता करावी, असा टोला लगावतानाच जे सत्तेसाठी काँग्रेसच्या पायाला हात लावतात, जे सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या मागे धावतात, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही. अशी टीका सुद्धा केसकर यांनी यावेळी केली. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री रात्री २ वाजेपर्यंत काम करतात असं सांगताना केसरकरांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. “जे लोक झोपतात, ते स्वप्न बघतात. जे लोक काम करतात ते दिवसरात्र धावत राहतात. म्हणून आमचे मुख्यमंत्री झोपत नाहीत. रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करतात. आम्ही सकाळी ११-१२ वाजता कार्यक्रम करणारे लोक नाहीत, अशी खोचक टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
स्वतः शाहरुख खान याने मानले तरुणांचे आभार , पहा नेमकं काय झाले
वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती