काँग्रेसमध्ये सुरु झाले अंतर्गत द्वंद्व, नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गटातील उलाढाल महाराष्ट्राने पहिले. काँग्रेसमध्ये चालू असणाऱ्या अंतर्गत दुहीमुळे पटोले (Nana Patole) आणि थोरात (Balasaheb Thorat) असे दोन गट काँग्रेस मध्ये पडले होते

काँग्रेसमध्ये सुरु झाले अंतर्गत द्वंद्व, नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गटातील उलाढाल महाराष्ट्राने पहिले. काँग्रेसमध्ये चालू असणाऱ्या अंतर्गत दुहीमुळे पटोले (Nana Patole) आणि थोरात (Balasaheb Thorat) असे दोन गट काँग्रेस मध्ये पडले होते यामुळे नाशिक शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना समर्थन दिले परंतु तांबे यांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर गटनेते पदाचा राजीनामा बाळासाहेब थोरात यांनी दिला. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत शीत युद्ध जगजाहीर झाले. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर आता नाशकात पुढे हे राजीनामा सत्र अशेच सुरु राहणार कि काय याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच तांबे कुटुंबियांना पक्षाने दिलेल्या वागणुकी चा निषेध करण्यासाठी नाशिक मधील पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात याले आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) तांबे विरुद्ध पटोले असा वाद सुरु होता. आता हा वाद नाशिक मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या (Congress) राजीनाम्यापर्यंत पोहचला आहे. विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निवडीवरून अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले होते. त्याचबरोबर सत्यजित तांबे यांच्या झालेल्या विजयापासून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष काहीसा दूर राहण्याचा प्रयत्न करत होता, पुढे थोरात यांच्या राजीनाम्यानंतर नाशिक मध्ये आता पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहेत.

नाशिक मधील पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले असून यामध्ये तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआयचे अध्यक्ष ललित मानभाव, सहकार सेलचे अध्यक्ष कुमार भोंडवे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा भोये, महिला शहराध्यक्ष रुख्मिणी गाडर, गीता जाधव, विकास सातपुते, राहुल बिरारी, दिनेश भोये, कैलास गाडर इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा सामूहिक राजीनामा देताना पदाधिकारी म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली असून, त्याचा निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. आम्ही केलेली डिजिटल सभासद नोंदणी व बूथ विसर्जित करत असे म्हटले आहे. पदाधिकाऱ्यांनी पेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबतही आपला संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : 

पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे, अतुल लोंढे

शशिकांत वारिसे हे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपत होते, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version