यांच्या आंगावर एकतारी केस आहे का ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

यांच्या आंगावर एकतारी केस आहे का ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज गट अध्यक्षांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून… आणि आता एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

राज ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत महाराष्ट्रात जेवढी आंदोलनं झाली त्या सर्वांपेक्षा आपल्या आंदोलनांना जास्त यश आलेलं आहे. ही आपली आंदोलनं लोकांच्या विस्मरणात कशा जातील, यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या. परंतु आपल्या आंदोलनानंतर ६५ ते ७० टोलनाके बंद झाले. परंतु ज्यांना टोल बंद करु अशी आश्वासनं देणाऱ्यांना पत्रकार प्रश्न विचारत नाहीत. मात्र प्रश्न कायम आम्हाला विचारले जात आहेत. सोळा वर्षांमध्ये मनसेने कोणकोणती आंदोलनं केली आणि ती कशी पूर्ण केली यासाठी पुस्तिका प्रकाशित करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

मनसे गटाध्यक्षांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ही लक्ष केलं आहे. ते म्हणाले आहेत की, स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बणाऱ्यांना एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आजा राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट

मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले, बुलढाण्याच्या सभेतून संजय राऊतांच्या हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version