नारायण राणेंना अरेतुरे करत संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाची होणारी गळती आणि येणाऱ्या निवडणुका या दृष्टीने त्यांचा हा दौरा खूप महत्वपूर्ण आहे.

नारायण राणेंना अरेतुरे करत संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिक मध्ये ठाकरे गटाची होणारी गळती आणि येणाऱ्या निवडणुका या दृष्टीने त्यांचा हा दौरा खूप महत्वपूर्ण आहे. त्यांचा हा दोन दिवसांचा नाशिक दौरा हा कालपासून सुरु झाला आहे. या दरम्यान संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

रोज एका मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा प्रकार हा समोर येत आहे तरी सरकार हे फक्त बसून होते. मुख्यमंत्रीच्या भूखंडाची दोन प्रकरण आली त्यांनतर मंत्री अब्दुल सत्तारांच्या भूखंडाची दोन प्रकरण आली अशी अनेक प्रकरण अधिवेशन काळात बाहेर येऊन सुद्धा सरकार जणू काही घडलंच नाही असं वागताना दिसून येत होत असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे संजय राऊत म्हणाले, विधानसभेत मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून होतं. शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला हा कोर्टात सुरु आहे. जर न्यायव्यवस्थेवर कोणताही दबाव हा आला नाही तर संपूर्ण योग्य निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आणि न्याय देखील आम्हालाच मिळणार हे निश्चित आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे राऊत दावा करत म्हणाले आहेत कि, हे सरकार फार काळ टिकणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. आता राज्यात २०२४ ची तयारी हि सुरु आहे. त्याआधी परिवर्तन हे होईलच. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. १६ आमदार अपात्र ठरतील. हे सरकार वेळकाढू सरकार आहे. हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने तर हे राम सुरू होईल. कोणी त्यांच्याबरोबर राहणार नाही असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत कि, शिवसेना एकच आहे आणि कायम एकच राहील. उध्दव ठाकरेंसोबत अख्या महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळं नाशिकचे शिवसैनिक जागेवरच आहेत, ते कुठंही जाणार नाहीत. सध्या राज्यातलं वातावरण परिवर्तनाच्या दिशेनं सुरु आहे, त्यामुळं हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा पुनरुच्चार राऊतांनी केला.

तर पुढे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना नारायण राणेंना थेट अरेतुरेची भाषा वापरली आहे. कोण आहात तुम्ही? आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ. आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफटात खाल्ली? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो, असं म्हणत राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, माझ्या माहितीनुसार, नारायण राणेंचं केंद्रीय मंत्रीपद जात आहे. त्याला अनेक कारण आहेत. नवीन गटातील लोकांना समजून घ्यायचे आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरु आहे असं ऐकण्यात आलं आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. आम्हालाही अनेक गोष्टींची माहिती मिळते पीएमओकडे आमचीही माणसं आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्यात पडू नये असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्याच सोबत राऊत पुढे म्हणाले पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधी भेटलो नाही. तसेच मी कधीच बेईमान गद्दारांना भेटत नाही. परंतु त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली आहे हे चांगलं आहे असा चिमटा संजय राऊत यांनी राणेंना काढला आहे.

हे ही वाचा:

सोशल मीडियावर शाहरुख खानला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, मुंबई पोलिसांनी दिले ‘हे’ उत्तर

सलमान खानच्या एक्स प्रियसीने केला मोठा खुलासा, ‘याबद्दल मला अजूनही भयानक स्वप्ने पडतात’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version