राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव आता हे असणार …

राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव आता हे असणार …

तेलेंगणाच्या राजकारणातून एक महत्वपूर्ण बातमी येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao KCR) यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांच्या पक्षाचं म्हणजेच, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi BRS) केलं आहे. पक्षाचं नाव बदलल्यानंतर आता राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा देशभर प्रचार केला जाणार आहे. इतकंच नाही तर समर्थकांनी हैदराबादच्या रस्त्यावर ‘देश का नेता केसीआर’ अशी घोषणा देणारे पोस्टरही लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून केसीआर यांचं राष्ट्रीय नेते म्हणून वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आता भारत राष्ट्र समिती (BRS) आहे, श्री राव यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीनंतर घोषित केले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि हैदराबाद शहरात पक्षाचा गुलाबी रंग उधळून साजरा केला.कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय म्हणून मान्यता देण्याचे नियम असलेल्या निवडणूक आयोगाला “नाव-बदल” कळवण्यात आले. नवीन पक्ष, राष्ट्रीय घटक म्हणून ओळखला जाण्यासाठी, किमान चार राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखला जाणे आवश्यक आहे किंवा कोणत्याही चार राज्यांमध्ये आणि लोकसभेच्या चार जागांवर सहा टक्के मते मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा पक्षाला किमान तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा (११ जागा) जिंकल्या पाहिजेत.

या वर्षी जूनमध्ये केसीआर यांनी टीआरएस नेत्यांसोबत राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याच्या कल्पनेवर चर्चा केली होती. मात्र, तेव्हा नवीन पक्षाच्या कल्पनेवर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. त्या वेळी टीआरएसच्या सूत्रांनी असंही सांगितलं की, ‘भारत राष्ट्रीय समिती’ (BRS), ‘उज्ज्वल भारत पार्टी’ आणि ‘नया भारत पार्टी’ यासारख्या काही नावांवर नव्या पक्षासाठी चर्चा सुरू होती.

हे ही वाचा:

शिंदे गटाला धक्का, मुंबईत कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुकेश आणि नीता अंबानी कुणी दिली जीवे मारण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version