माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? – रामदास कदम

माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? – रामदास कदम

शिवसेना फुटीनंतर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होतं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेता आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दापोलीत निष्ठा यात्रा पार पडली. त्या निष्ठा यात्रेला उत्तर देण्याकरीत रामदास कदम यांनी सुद्धा मेळावा आयोजित करण्यात आला होता. रामदास कदमांनी मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी देखील विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली. आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत,” अशी टीका यावेळी रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवर केली.

रामदास कदम यांनी दापोलीत शिवसेनेवर चांगलाच हल्लबोल केला आहे. ते म्हणाले, “दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा योगेश कदम यांनी बसवला. एकावेळी ९० विकास कामे नगरपरिषदेत सुरु केली होती. विकासाला किंमत नाही का? अजित पवार यांनी पाठवलेल्या खोक्याला किंमत नाही का? आदित्य खोके खोके, गद्दार म्हणत आहेत, परंतु आदित्य तुम्हीच गद्दार आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता. पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी आदित्य आपण केला आपण केला असं सांगत होते. दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत होते. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं गद्दारी याला म्हणता.

Raj Thackeray Live : ‘२६ सप्टेंबर ला नवी कार्यकारिणी जाहीर करेन’

“बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं ते सांगत असतील. पण ‘आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे,’ अशी खोच टीका रामदास कदमांनी केली. आम्ही शिवसेनेसाठी जेलमध्ये गेलो, तुम्ही काय भीक दिली का? शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मंत्रालययात किती वेळा गेलात? महाराष्ट्राशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, तुम्ही स्वतःचा स्वार्थ पाहिलात, अशी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली. उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबिटीस कशी होत नाही अश्या जहरी शब्दांत रामदास कदम यांनी टीका केले आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे पोहोचले नागपुरातील फुटाळा तालाबमधील फाउंटन शो पाहण्यासाठी

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

संजय राऊत यांची आज सुटका होणार कि पुन्हा कोठडी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version