आज दि. २७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे.
आज राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी सरकारने आतापर्यंत घेतलेल्या आणिक मुद्यावर भाष्य केले आहे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांचे देखील त्यांनी कौतुक केले आहे तसेच कोरोनानंतर युवकांना रोजगार देण हा सरकारचा हेतु असल्याचे सांगत ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे राज्यपाल बैस यांनी अभिभाषणा दरम्यान सांगितले.
- हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्यासह अनेक समाज सुधारकांच्या सिद्धांतावर चालले आहे.
- सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सेवा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- कोरोना नंतर युवकांना रोजगार देणे हा सरकारचा हेतू आहे.
- ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे.
- जानेवारी २०२३ मध्ये डाओसमध्ये जाऊन करार केले आहेत.
- युवकांना कुशल बनवण्यासाठी गोदिया आणि गडचिरोली येथे दोन ट्रेनिंग सेंटर उभे केलेत.
- महाराष्ट्र देशाचे प्रमुख औद्योगिक राज्य आहे. निर्यातेत राज्य अग्रेसर राहिले आहे. माझ्या राज्याने २०२६ – २७ पर्यत ५ प्रिलियंट डॉलर पर्यत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. असही राज्यपाल यावेळी म्हणाले.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मुंबईत मेट्रो लाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ३० किलोमीटर, नागपूर ४० किलोमीटर आणि पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. असही राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितलं.
- आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- नीती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला.
- ५३१ किलोमीटर समृध्दी महामार्गाचे उदघाटन केले आहे.
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतलाय.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी
दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…
देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या