महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केलेल्या ट्वीटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई पोलिसांकडे रात्री फटाके वाजत असल्याने तक्रार करणाऱ्या काही मुस्लीम व्यक्तींच्या ट्वीटवर व्यक्त होताना त्यांनी ‘दिवाळी असल्याने सहन करा’ असा सल्ला दिला आहे. तसंच ‘तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरु आहे’ याची आठवणही करुन दिली आहे.
विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठीकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे.@News18lokmat @zee24taasnews @abpmajhatv @news_lokshahi pic.twitter.com/PlTMLLlqfr
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 25, 2022
हेही वाचा :
Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणामुळे मंदिर बंद राहणार
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एक ट्विट केले आहे. मनोज चव्हाण यांनी या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीचा उल्लेख करत काही स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. याच ट्विटमध्ये, विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे, असे मनोज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नेमकं काय प्रकरणआहे ?
ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्याचं सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पुढे ते म्हणाले की “हिंदू एकटवणं, एकत्रित येऊन सण साजरे करणं हीच राज ठाकरेंची भूमिका आहे, म्हणूनच दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. फटाके काही १२ महिने वाजत नसतात. सणाच्या दिवशी आनंद व्यक्त करण्याची ती पद्धत असून प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे. यावर निदान हिंदूंनी तरी आक्षेप घेऊ नये”. अशा तक्रारींना थारा दिला जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.