spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

नवनीत राणा यांचा नेतृत्वाखाली हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचे आयोजन करण्यात आलं होते. तेव्हा खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यवर टीका केली आहे. जिथे-जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल, तिथे-तिथे शुद्धीकरण करण्यात यावे, असे उद्गार नवनीत राणा यांनी वुत्क्त केले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो,’ असा हल्लाबोल देखील नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणा यांचा नेतृत्वाखाली हनुमान जयंती निमित्त सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचे आयोजन करण्यात आलं होते. तेव्हा खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यवर टीका केली आहे. जिथे-जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल, तिथे-तिथे शुद्धीकरण करण्यात यावे, असे उद्गार नवनीत राणा यांनी वुत्क्त केले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो,’ असा हल्लाबोल देखील नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडल्यामुळे पुन्हा नवीन वादाला आणि आरोप प्रत्यारोपला सुरवात होण्याची चिन्ह आता दिसत आहे.

नवनीत राणा यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी राजकारणात मनीषा कायंदे यांनी उडी मारली आहे. नवनीत राणा म्हणाल्या उद्धव ठाकरे हे आपले घर सांभाळू शकले नाहीत, ज्या विचारांवर तुमचे ४० आमदार निवडून आले, आणि ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा धरून ठेवली होती ती तुम्हाला सांभाळता आली नाही बाळासाहेब ठाकरेसुद्धा अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त शेवटपर्यंत ठेवली नाही,” असे टीकास्त्र नवनीत राणांनी सोडले आहे. त्यामुळे नवीन चर्चाना उधाण आले आहे.

त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनीषा कायंदे यांनी नवनीत राणेंना चांगलेच बोल सुनावले आहेत. “नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना शोधून काढावे. ते फरार असून, अद्याप पोलिसांना ते सापडले की नाही, याची माहिती करून त्याचा उलगडा करून घ्य्याव आणि मग दुसऱ्यांच्या वडिलांना काय वाटत असें आणि काय वाटत नसेल याच्यावर भाष्य करावे. तसेच स्वत: केलेल्या भानगडी पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे आणि त्यानंतर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलावे. असे खडेबोल सुनावले. उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याची नवनीत राणा तुमची लायकी नाही.तसेच ”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्यक्तीगत आरोप केले, तर भाजपा पेटून उठेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला दिला आहे. याबाबत विचारले असता मनीषा कायंदेंनी म्हटलं, “बावनकुळे काय बघू घेणार आहेत? महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला ओळखलं आहे. तुम्ही महाराष्ट्रात नुसता खेळ माजवून ठेवला आहे , कपटकारस्थान रचत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना कधीही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही,” असा पलटवार देखील मनीषा कायंदेंनी केला आहे.

हे ही वाचा : 

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

कोरोना घालतोय धुमाकूळ! उद्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची होणार बैठक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss