लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून Devendra Fadnavis यांनी समतेच्या मुल्यांचा अपमान केला: Nana Patole

लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून Devendra Fadnavis यांनी समतेच्या मुल्यांचा अपमान केला: Nana Patole

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा काल (सोमवार ३० सप्टेंबर) कोल्हापूर येथे पार पडली. यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्होट जिहाद झाल्याचा खळबळजनक दावा केला असून आता यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांच्या यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अश्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावरून फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

“लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचा इतिहासच माहित नाही. महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या मावळ्यांसह मुस्लीमही होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला, त्याच राज्याचा गृहंमत्री लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशी वक्तव्ये करतो हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. लव्ह जिहादचे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत, कारवाई करण्याचे अधिकार त्याच्यांकडे आहेत मग कारवाई का करत नाहीत. त्यांच्याच पक्षाचा एक आमदार एका धर्माला शिव्या देत महाराष्ट्र तोडण्याचे पाप करत आहेत. महाभ्रष्ट महायुतीचे अडीच वर्षातील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस आणि महायुतीकडून अशा प्रकारची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत पण राज्यातील सुज्ञ जनता याला बळी पडणार नाही,” असे पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

कोल्हापूर येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद पाहायला मिळाले. धुळे लोकसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि त्याचा चार हजार मतांनी पराभव होतो. निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही… कधी हा पक्ष जिंकेल तर कधी तो पक्ष जिंकेल… मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून २८ पैकी १४ मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis यांनी ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान; Congress नेत्याचा जोरदार हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version