spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; राज्य सरकार विरोधात निदर्शनं

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण खूप तापल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये होणार प्रकल्प हा पुन्हा एकदा गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवरती धरलं आहे. महाराष्ट्राला रोजगार मिळवून देणारे महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यामुळे पुण्यातील (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आक्रमक झाली आहे. राज्यात नव्याने सुरु झालेल्या “मुंबई-अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस”चे चालक, मालक शिंदे आणि फडणवीस म्हणत सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मामलेदार कचेरीजवळ आंदोलन केलं. भाजपला दिलेलं प्रत्येक मत गुजरातच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी अशा आशयाचं बॅनर हाती घेत त्यांनी हे आंदोलन केलं.

महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी आणि सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार आहे. राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणं, हे या सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला करुन दिली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचं मोठं नुकसान होत आहे. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले जात आहेत, ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे. सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे, असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातील तरुणांना गुजरातमधील कंपन्यांकडे नोकरीसाठी हात पसरावे लागणार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्लादेखील त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. राज्यातील काही प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील नेत्यांनी एकमेकांवर फटकेबाजी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना यासाठी कारणीभूत असल्याचे आरोप करत आहेत.

 ही वाचा :

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये राष्ट्रवादीचं आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss