मुंबईतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डे पुन्हापुन्हा बुजवूनही रस्त्यांची परिस्थिती फारशी बदलेली दिसत नाही. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी नेहमीच मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरले जाते. पालिकेवर सातत्याने टीका होते. अगदी इतर सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठीही पालिकेला जबाबदार ठरवले जाते. त्यावर उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व रस्ते ताब्यात घेऊन ते खड्डेमुक्त करण्याची ठोस भूमिका घेतली आहे.
हेही वाचा :
World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईतील ४५० किमीची रस्ते काँक्रिटचे करावेत असे आदेश दिले आहेत. येत्या दोन वर्षामध्ये मुंबईतील सर्व रस्ते कॉंक्रिटचे असतील, त्यावर एकही खड्डे दिसणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी योजना जाहीर केली. आता त्यांनी नागपूरकडेही लक्ष द्यावं. नागपूरमधली ही खड्ड्यांची रांगोळी!
फोटो सौजन्य : @mataonline pic.twitter.com/JZtzAnl27U— NCP (@NCPspeaks) October 16, 2022