NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणार्या गुजरातचा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : 

शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये राष्ट्रवादीचं आव्हान

यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिंदे-फडणवीस आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, या प्रसंगी गुजरात सरकारची निर्भत्सना प्रकल्प चोर अशी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्‍या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्यात आला. दरम्यान, उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला” हे धोरण शिदे-फडणवीस सरकारने आखले असून त्यास मोदींचा पाठिंबा आहे. या पुढे जर असे प्रकल्प पळविले तर या सरकारला जनता पळवून लावेल, असा इशारा विक्रम खामकर यांनी दिला.

National Unity Day : देशातील दिग्गज नेत्यांकडून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली केली अर्पण

“वेदांन्तानंतर सांगितलं होतं, मोठा प्रकल्प येणार आहे. त्याचं काय झालं माहिती नाही. प्रकल्प जातं असतील, तर महाराष्ट्राची अस्मिता मलीन केली जातं आहे. औद्योगिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला होता, आता ते चित्र राहिलेलं नाही. महाविकास आघाडीकडून चूक झाली असेल तर, आता ती सुधारायला पाहिजे होती. महाराष्ट्राची दिल्लीत एवढी चालते, तर त्यांनी रॉकेटचे प्रकल्प देखील आणले पाहिजे होते,” असा टोला,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-भाजपा सरकारला लगावला आहे.

येणार प्रत्येक प्रकल्प हा गुजरातला जातो हे वाईट – राज ठाकरे

Exit mobile version