केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी “आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटू लागलंय” असं विधान केल्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आज राजकारण म्हणजे शंभर टक्के सत्ताकारण झालं आहे, अशी खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात ज्येष्ठ समजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
काय म्हणाले नितीन गडकरी?
“राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, होतं पण आता शंभर टक्के सत्ताकारण झाला आहे”, असे नितीन गडकरी म्हणाले. “मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं”,असं वाटतं कारण आयुष्यात राजकारण राजकारण सोडतात आणि गोष्टी करण्यासारखे आहेत अशी भावना ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
Addressing Shri Girish Gandhi Amrut Mahotsav Satkar Programme, Nagpur https://t.co/nUoBvbw2N6
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 23, 2022
“आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन सुद्धा समृद्ध व्हावं, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वासचं कल्याण व्हावं अशी आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं आपल्या संस्कृतीत लिहिलेला नाही”,असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले
“माणसाच्या मोठेपणाचा कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही जो निवडून येतो तो सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकत असं म्हटलं जातं”, असेही नितीन गडकरी म्हणाले.