एक हजार एक टक्के ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित – विनायक राऊत

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा एक हजार एक टक्के विजय निश्चित असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला.

एक हजार एक टक्के ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित – विनायक राऊत

Vinayak Raut

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा एक हजार एक टक्के विजय निश्चित असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला.

अंधेरी पूर्व विधानसभा विरोधी उमेदवाराने डिपॉझीट वाचवण्याचा प्रयत्न करावा असे विनायक राऊत म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कसाही नंगानाच केलेला चालतो. उद्धव ठाकरेंचा ऐकेरी भाषेत उल्लेल करणं, त्यांना शिवीगाळ करणं त्यांना चालते. तुमच्या एका आमदाराने दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केली ते चालते. तुमचे इतर मंत्री, नेत्यांनी हैदोस घातलेला चालतो. मात्र, शिवसेनेच्या सर्व मंडळींनी आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करुन टीका टिप्पण्णी केली तर १५३ च्या नोटीसा द्यायच्या असे विनायक राऊत म्हणाले. आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही आमची मत मांडत असल्याचे राऊत म्हणाले. पोलीस आणि प्रशासन यांचा शिंदे सरकार दुरुपयोग करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

प्रशासन जर सत्ताधारांचे आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून वावरत असतील तर त्यांना प्रशासनाची योग्य ती जाणीव करुन देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर आहे. महापालिकेचं प्रशासन सत्ताधारऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे राऊत म्हणाले. प्रशासनाचे कान टोचल्याबद्दल हायकोर्टाचे राऊत यांनी आभार मानले. प्रत्येक गोष्टीला उच्च न्यायालय हाच जर मार्ग असेल तर मुंबई महापालिकेचे प्रशासन बरखास्त करा असेही राऊत म्हणाले.

प्रशासन जर सत्ताधारांचे आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून वावरत असतील तर त्यांना प्रशासनाची योग्य ती जाणीव करुन देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर आहे. हायकोर्टाचा दणका मिळाल्यानंतरच त्यांना शहाणपणा सुचला असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. शिंदे सरकार हे पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग करत आहे. त्यांच्याच मंत्र्यांचा शिंदे सरकारवर विश्वास नसल्याचे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या मुद्यावरुन देखील विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. शिंदे सरकार हे सद्या बाहुले म्हणून बसलं असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा :

Rutuja Latke : अखेर BMC ने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला

Election Commission : हिमाचल, गुजरात निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version