चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची, राज ठाकरेंची प्रभाग पद्धतीवर टीका

परिसरात प्रभाव असलेला चांगला कार्यकर्ता या प्रभाग पद्धतीमुळे निवडणून येऊ शकत नाही. चार वॉर्डाच्या प्रभागात सामान्य उमेदवार हा टीकू शकत नाही.

चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची, राज ठाकरेंची प्रभाग पद्धतीवर टीका

सध्या राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नागपुरातील रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील वॉर्ड पद्धतीवर सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत तीन वार्डचा एक प्रभाग, चार वार्डचा एक प्रभाग ही पद्धतच चुकीची आहे. यामुळे नागरिकांना आपल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागतात. एकदा निवडून आले की नगरसेवकही गब्बर बनतात. ही पद्धत बंदच केली पाहीजे.

त्याचप्रमाणे मोठे राजकीय पक्ष आणि धनाढ्य उमेदवारांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत एक वार्ड एक प्रभाग पद्धतीनुसार निवडणूका होतात. त्याचप्रमाणे राज्यातही व्हायला हव्यात पण, काही मोजक्या मोठ्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी ही पद्धत अंमलात आणली जात नाहीये. परिसरात प्रभाव असलेला चांगला कार्यकर्ता या प्रभाग पद्धतीमुळे निवडणून येऊ शकत नाही. चार वॉर्डाच्या प्रभागात सामान्य उमेदवार हा टीकू शकत नाही. फक्त मोठे राजकीय पक्ष आणि धनाढ्या उमेदवारच टीकू शकतात.

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. निवडणूकीत मोठं होण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध लढणे गरजेचे असते. प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या असतात. त्याचा अभ्यास करुनच त्याचे व्हिजन तयार करता येते. त्या व्हिजनवरुनच तुम्हाला जनता मतदान करीत असते. त्यामुळे आम्ही चांगले उमेदवार देऊ. नागपुरात आम्ही भाजपविरुद्ध लढू तसेच आमचे उमेदवार निवडूनही येतील असा दावा यावेळी राज ठाकरे यांनी केला.

प्रभाग पद्धतीमुळे एकीकडे फक्त मोठे पक्ष विजयी होतात आणि खरा समाजसेवक मागे राहून जातो. यासोबतच चार वार्डांचा प्रभाग असल्यास वेग-वेगळ्या पक्षाचे दोन-दोन उमेदवार निवडून आले तर एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करतात. त्यामुळे प्रभागाचा विकास होत नसल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

लोकशाहीत आतापर्यंत मतदारांची इतकी प्रतारणा कोणीही केली नव्हती, पण तुम्ही युती-आघाड्या करुन निवडणूका लढवता, लोकं तासनतास रांगेत राहून मतदान करतात. लोकासमोर एक गोष्ट सांगता, तुमचं ऐकून लोक तुम्हाला मतदान करत असता. पण निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळचा शपथविधी करतो. लोकांनी या सगळ्यांचा हा खेळ बघत राहायचे का. त्या मतांचा हा अपमान आहे. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा:

World Wrestling Championship : कुस्तीपटू बजरंग पुनियानं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले

पवारांच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसीय दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version