पंतप्रधानांची कोणतीही जात नसते – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनेक मुद्यांचे स्पष्टीकरण हे दिले आहे.

पंतप्रधानांची कोणतीही जात नसते – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अनेक मुद्यांचे स्पष्टीकरण हे दिले आहे. राज्यात २०१४ ते १९ या कालावधीमध्ये ओबीसीसंदर्भात २२ पैकी २१ निर्णय मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आपण घेतल्याचे अप्ष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. मी निवडून येत असलेल्या नागपूर मतदारसंघामध्ये ओबीसी सर्वाधिक असून त्यांच्यामुळेच मी निवडून येत आहे. त्यांच्यामुळेच मी घडलो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनात बोलताना केले.

ओबीसींसाठी नोकरी, शिक्षण, हाॅस्टेल, विदेश शिष्यवृत्ती असेल, आयएएस, आयपीएस ट्रेनिंग असेल या सर्व मागण्या मान्य करून शासन निर्णय जारी केल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितले की, जे अपेक्षित निर्णय आहेत ते घेतले जातील. मी ओबीसी आरक्षण चार महिन्यात नाही आणलं, तर संन्यास घेणार म्हटले होते. तो मी हा व्यक्ती आहे. त्यामध्ये आणखी काही करण्याची गरज आहे ती करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. फडणवीस यांनी अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले की, मी मुख्यमंत्री असताना स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांची कोणती जात नसते, पण पंतप्रधान मोदी हे ओबीसीतून येतात. या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी तसेच ओबीसींच्या सन्मानासाठी जे काही असेल, ते करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारमधील ४० टक्के मंत्री ओबीसी समाजातून आहेत. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातून आता डाॅक्टर होत आहेत. यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होत होती, पण मोदींनी पूर्ण केल्याचे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : –

शिंदे गटाला आयोगाकडे जाण्याचा हक्क नाही – ठाकरेंची भूमिका

Exit mobile version