स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले, ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी…

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे . तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन काँग्रेसला घेरले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले, ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी…

सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळ्याचं डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. हा पुतळा २६ ऑगस्टला दुपारी १ च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. याच प्रकरणी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान पालघरमधील वाधवन बंदराची पायाभरणी केली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सुमारे १,५६० कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे . तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन काँग्रेसला घेरले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जातो. परंतु त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते कोर्टात गेले आहे, असा हल्ला राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी काँग्रेसवर केला. शिवसेना उबाठाला यामाध्यमातून मोदी यांनी आरसा दाखवला. कारण काँग्रेसच्या सावरकर यांच्या भूमिकेवरुन शिवसेना उबाठाने कधी ठोस भूमिका घेतली नाही. पालघरमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सावरकरांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आमची मूल्ये वेगळी आहेत. भारतमातेचे शूर सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करणारे आणि देशभक्तांच्या भावना चिरडणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही आम्ही माफी मागायला तयार नाही. महाराष्ट्राचा आहे. अशी मूल्ये जनतेला कळावीत, मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा भारताची गणना जगातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. भारताच्या या समृद्धीचा एक मोठा आधार होता भारताची सागरी शक्ती… आपली ही शक्ती महाराष्ट्रापेक्षा चांगली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या प्रगतीसाठी काय निर्णय घेतले होते, हे कोणाला माहीत असेल.

Exit mobile version