ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. याबरोबरच दोन्ही गटाला शिवसेना नावही वापरता येणार नसल्याचं म्हटले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर दुसरीकडे धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तर पक्षातील प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा: संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला
निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे. कारण मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. तर व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रत्येकाला कळवण्यात आले आहे की, या सर्व प्रकरणावर कोणतेही प्रतिक्रिया देऊ नयेत.
तसेच या सर्व प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे , राजू पाटील आणि गजानन काळे यांनी ट्विट केले होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोला लगावत म्हटलं आहे की, ”संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्ह ही.” असं ते ट्वीट करत म्हटले आहे. तसेच त्यांनी नुकतेच अजून एक ट्विट केले आहे आणि त्या ट्विट मध्ये ते म्हणले आहेत कि, ‘उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल’
Raj Thackeray : धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन#rajthackeray #uddhavthackeray #balasahebthackeray #shivsena #politics #maharashtra @RajThackeray @ShivSena pic.twitter.com/y2MXC2hvgM
— Time Maharashtra (@TimeMaharashtra) October 9, 2022
तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी देखील उद्धव ठाकरे गटाला लक्ष केलं आहे. काळे ट्वीट करत म्हटले आहे की, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही. ते पुढे म्हणाले, ”आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीचं घड्याळ, नाहीतर अबू आझमीच्या सायकलचाच आधार आहे. संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा.”
हे ही वाचा:
सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले
आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.