spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पाहणीसाठी गेले असता त्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) समर्थक आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या राड्यावरून प्रतिक्रिया देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज (गुरुवार, २९ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत म्हणाले, “मला कोणाची नावे घ्यायची नाही ही गुंडागर्दी आहे, मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर काल जे झालेल आहे ते महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या गुंडांनी त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील त्यात मला पडायचं नाही. पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे. ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत. खुलेआम रस्त्यावरती पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला, फक्त पोलिसांवर आता हल्ले करण्याचंच बाकी होतं. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा काल प्रयत्न झाला. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर, काय करतायेत गृहमंत्री? आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीच? काय तर म्हणे त्यांच्या बोलण्याची ती स्टाईल आहे. मग आम्ही बोलतो मग आमच्या वरती का गुन्हे दाखल करता? आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता, प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून त्यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृती,संस्कार या निमित्ताने फडणवीसांच्या काळामध्ये पूर्णपणे उध्वस्त झाली आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवाद राष्ट्रभक्तीची नाव घेता तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी येवढा भ्रष्टाचार, व व्यभिचार आणि अनाचार कोणी केलेला नसेल. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी, तेच पैसे निवडणुकीत राजकारणासाठी वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील. इथे आयएनएस विक्रांत युद्धनौका आमची. त्या युद्धनौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भाजपने पैसे खाल्ले ५८ कोटी रुपये, हा चोर इथेच बसला आहे मुलुंडला. त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर आयएनएस घोटाळ्याची चौकशी आधी बंद करा, हे चोरच आहेत ना… यांच्यावर काय विश्वास ठेवायचा यांनी देशच विकून खाल्ला आहे, शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपच कृत्य हे आदम आणि नीच आहे. शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या पाठोपाठ आता मिळणार Mohan Bhagwat यांनाही Z+ सुरक्षा

Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss