लोकसभा निवडणुकीच्या (Loksabhaa Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यातील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून तिढा कायम आहे. खासकरून महायुतीमधून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Election) जागा कुणाकडे जाते, ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP)आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकला आहे. यातच, मंगळवारी, (२ एप्रिल) रत्नागिरी – सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत (Kiran Samant) यांनी माघार घेतल्याची पोस्ट टाकली होती. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी बोलताना, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली,” अशी प्रतिक्रिया दिली.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागेवरून आज महायुतीची बैठक
रत्नागिरी – सिंधुदुर्गा मतदारसंघाच्या जागेवरून आज दुपारी ३ वाजता महायुतीची बैंठाक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत, निलेश राणे आणि नितेश राणे हे उपस्थित राहण्याची शक्याता आहे. त्यामुळे या जागेचा तिढा आज सुटणार का ह्याकडे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
Pune Loksabha Election: Vasant More यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश, पुण्यातून लढणार लोकसभा निवडणूक Ramesh Baraskar यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, माढा मतदारसंघात तिरंगी लढत Follow Us