महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात गदारोळ सुरू, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा निषेध

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यादरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव पारित करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात गदारोळ सुरू, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा निषेध

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यादरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव पारित करण्यात आला. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्वांनी मौन पाळले. यानंतर काँग्रेस आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, बराच वेळ हा गोंधळ सुरूच होता, त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस आमदारांना प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस आमदारांनी सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला, त्यात ते म्हणाले की, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असून सरकारने अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, असे काँग्रेस आमदारांनी सांगितले. काँग्रेस आमदारांच्या आरोपांवरून गदारोळ होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे, कालच आम्ही या विषयावर समिती स्थापन केली आहे. गेल्या वर्षभरात आम्ही शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत दिली आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र, फडणवीसांच्या या उत्तरानेही काँग्रेसचे नेते समाधानी झाले नाहीत आणि त्यांनी या विषयावर चर्चेची मागणी सुरू केली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्ष काँग्रेसच्या आमदारांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत घोषणाबाजी केली. माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या निदर्शनात फक्त ठाकरे गटाचे अंबादास दानवे उपस्थित होते. त्याचवेळी या निदर्शनाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उपस्थित नव्हता.

हे ही वाचा:

Exclusive, बळीराजाच्या संदर्भामध्ये शासन गांभीर्य आहे, देवेंद्र फडणवीस

अजित पवार गट आणि शरद पवार समर्थक आमदार एकत्र बसणार का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version