spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितेश राणेंच्या वक्तव्यावर रोहित पवार यांचे प्रत्युत्तर

मुंबई : आमदार नितेश राणेंनी आज पत्रकार परिषदेत उदयपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर येथे हिंदुंवर हल्ला झाल्याचे सांगितले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत “आमच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत” असं म्हटले आहे.

दरम्यान, नितेश राणेंनी म्हटले, “जर अश्या प्रकारे हिंदुना टार्गेट करण्यात येत असेल तर आम्ही जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत. हे काय आता महाविकास आघाडी सरकार नाही किंवा येथे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही नाहीत. त्यामुळे आता हल्ले झाले तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ असे नितेश राणेंनी खुले आव्हान केले आहे. त्यानंतर राणेंच्या आरोपाला राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी पोस्टच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले, “सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत.कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत.त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं.आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. असे उत्तर आता रोहित पवार यांनी नितेश राणे यांना दिले.

Latest Posts

Don't Miss