“सगेसोयरे अध्यादेश सरकारने अंमलात आणावा अन्यथा उपोषणात आता माघार नाही..” ; Manoj Jarange Patil यांनी दिला इशारा

“सगेसोयरे अध्यादेश सरकारने अंमलात आणावा अन्यथा उपोषणात आता माघार नाही..” ; Manoj Jarange Patil  यांनी दिला इशारा

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असल्याचे आपण पहिले आहे. हे मराठा आरक्षण मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजासाठी करत आहेत. सुरुवातीच्या काळात जेव्हा हे आरक्षण समोर आणून उपोषण केले होते त्यावेळी त्यावर त्वरित निकाल लागला होता. त्यांनतर त्यांनी ‘सगेसोयरे’ अध्यादेशसाठी त्यांनी पुन्हा मागणी केली होती. मराठा आंदोलक आज शनिवारी २० जुलैपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी याबाबतची या आधीच घोषणा केली होती. त्यानुसार जालन्याच्या अंतरवली सराटी इथे ते उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते. सरकाने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले होते. पण अजूनही त्यात काही होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

हे ही वाचा:

HEAVY RAINFALL : पुढील २४ तासात कोसळणार मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज

VIDHANSABHA ELECTION मधील दोन निवडणूक चिन्ह गोठवली ; SHARAD PAWAR यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version