बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा संजय राऊत

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. थेट बाबरी विषयाला हात घालून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरवात केली. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले. बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले आहेत असं त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. आणि लगेच त्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.

बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा संजय राऊत

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. थेट बाबरी विषयाला हात घालून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरवात केली. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले. बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागले आहेत असं त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. आणि लगेच त्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांना उद्धेशून संजय राऊत म्हणाले,’राजकीय उत्सव हे साजरे करणारे, बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही मांडीला मांडी लावून बसवतात. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या, चंद्रकांत पाटील यांचा आधी राजीनामा घ्या, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. स्वतःला शिवसेनेचा वारसदार, शिलेदार समजणारे एकनाथ शिंदे अजूनही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हा शुद्धा लाचार, लाळघोटेपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र तरीही ठाकरे गटाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. एकनाथ शिंदे यांना उद्धेशून संजय राऊत म्हणाले,’राजकीय उत्सव हे साजरे करणारे, बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही मांडीला मांडी लावून बसवतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी याचा साधा निषेधही नाही केला. यांना कोण वारसदार म्हणणार? आजही ते तुमच्याबरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार, लोचट आणि मिंधे आहात. असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असू नये. मुख्यमंत्री आणि ४० आमदार खुलासे करणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या… अशा स्काडाक शब्दात संजय राऊत मुखास्त्र सोडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात यात आहे परंतु यांच्या सांगण्यावरूनच सांगण्यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वक्तव्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी सुद्धा फक्त स्पष्टीकरण देऊन आम्ही समाधान मानणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली. ते म्हणाले, ‘नाराजी व्यक्त करून काय फायदा? बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारा… हा लोचटपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा, फडतूस पणा आहे. हा अपमान तुम्ही सहन करताय, हा काय प्रकार आहे? वारसदार, शिलेदार म्हणवता. नाव घेऊ नका बाळासाहेबांचं. अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना खडसावलंय.

त्याचबरोबर राजकीय वर्तुळात अशी सुद्धा चारचा चालू आहे की , चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे . संजय राऊत यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावल्यात. जर असे असते तर अमित शाह यांनी जाहीरपणे का सांगितलं नाही त्यामुळे आमची मूळ मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. कारण ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात त्यामुले त्यासंबंधी त्यांनी वाच्यता करावी. असे सांज राऊत यावेळी म्हणाले.

हे ही वाचा : 

प्लॅनेट मराठीवर १४ एप्रिलपासून चिकटगुंडे २

राजकणार भूकंप?, अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल

नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version