spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोणाच्याही जाण्यामुळे शिवसेनेला फरक पडत नाही , आज पक्षप्रवेश करणारे मूळचे शिवसैनिकी – राऊतांच्या शिंदे गटाला टोला

संजय राऊत (SANJAY RAUT)यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला खडे बोल सुनावले आहे. संजय राऊत म्हणाले कि ज्यांना निघून जायचं होत ते गेले आता जे उरले ते खरे शिवसैनिक आहेत .

संजय राऊत (SANJAY RAUT)यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला खडे बोल सुनावले आहे. संजय राऊत म्हणाले कि ज्यांना निघून जायचं होत ते गेले आता जे उरले ते खरे शिवसैनिक आहेत . त्यांच्या जीवावर शिवसेना(SHIVSENA) तेव्हढ्याच ताकदीने उभी आहे . कोणाच्याही जाण्याचं शिवसेनेवर परिणाम झालेला नाही. शिंदे गटाला उद्देशून वक्तव्य करताना राऊत म्हणाले कि तुम्हाला जर कागदाला चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल असेल तरी तुम्हाला जनतेचा प्रेम कधीही मिळणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कागदावरच कागदावरच राहील कारण त्यांना तो अधिकारच नाही अशी टीका  राऊतांनी ह्या वेळेस केली .

कोकणाची बाळासाहेबांवर श्रद्धा कायम राहील – संजय राऊतांचा विश्वास कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे. कोकणामध्ये कायमच शिवसेनेची सत्ता होती. त्यावर संजय राऊत म्हणाले कि कोकणाने नेहमीच शिवसेनेचा वाढीमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे, कोकणाने कायम बाळासाहेबांप्रती आपली श्रद्धा कायमी ठेवली आहे. म्हणूनच आजची खेड चे संभाविराट प्रमाणात झाली. आता खेड नंतरची पुढची सभा मालेगावला होणार आहे. आज उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज जे शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत ते मूळचे शिवसैनिक आहे असं राऊत म्हणाले .

 

काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा मुद्दा – आठ दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये एका काश्मिरी पंडितांची त्याच्या बायको समोर हत्या करण्यात आली. ह्या घाटाने आधी सुद्धा १७ ते १८ पंडितांची अशीच निर्घृणपणे हत्या कारण्यात आली. परंतु भाजपाला याबद्दल अजिबात दुःख होत नसल्याचे राऊत म्हणाले, भाजप कडून आतापर्यंत कोणीही तिथे गेलेल नाही , त्यान फक्त ह्याच राजकारण करायचं आहे असं देखील त्यानि आपल्या वक्तव्यात सांगितलं. पंजाब मध्ये सुद्धा खलिस्तानी पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने ह्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी .

एकनाथ शिंदे ह्यांची शिवधनुष्य यात्रा- उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना यात्रेला प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदे ह्यांनी शिवधनुष्य यात्रा काढण्याचा निर्णय घेतला ,त्यावर राऊत म्हणाले कि , उद्धव ठाकरे ह्यांच्या शिवगर्जना यात्रेला लोकांचा मिळणार भरगोस प्रतिसाद पाहून विरोधक हादरले आहे, म्हणून ते यात्रा काढत आहे. त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी लोकांचे प्रेम आणि साथ उद्धव ठाकरे ह्यांनाच मिळेल उलट अशा यात्रांमुळे तुमचीच गद्दारी अजून लोकांसमोर येईल.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss