ज्यादिवशी डोक्यावरून मोदी शहाचा हात जाईल त्यादिवशी महाराष्ट्रात तुमची लायकी कचऱ्याइतकी राहील; Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर पलटवार

ज्यादिवशी डोक्यावरून मोदी शहाचा हात जाईल त्यादिवशी महाराष्ट्रात तुमची लायकी कचऱ्याइतकी राहील; Sanjay Raut यांचा CM Eknath Shinde यांच्यावर पलटवार

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुका झाल्यावर ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद अशी भूमिका घेतली आहे. यावरून राज्यात राजकीय चर्चा चालू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून शिवसेना ठाकरे गटावर जोरदार आगपाखड केली. “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते,” अश्या खोचक शब्दांत त्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या ट्विटर पोस्टमुळे आता नवा वाद निर्माण झाला असून त्यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर संजय राऊत यांनी आज (सोमवार, ३० सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देत, “गुजरातच्या दरबारात भांडी घासायला अडीच वर्ष कोण गेलं होतं?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच,”ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरचा मोदी शहाचा हात जाईल त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची लायकी कचऱ्याइतकी राहील,” असा घणाघात त्यांनी केला आहे.

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

संजय राऊत यावेळी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना स्वतः ट्विट करता येतं का ? ट्वीट करायला जी माणसे ठेवले आहेत त्यांना नीट ट्रेनिंग द्या. कठोरी घेऊन दिल्लीच्या दरबारात गेले अडीच वर्ष कोण आहेत? गुजरातच्या दरबारात भांडी घासायला अडीच वर्ष कोण गेलं होतं? तुम्हीच गेला होतात मुख्यमंत्री पदासाठी… ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरचा मोदी शहाचा हात जाईल त्या दिवशी महाराष्ट्रात तुमची लायकी कचऱ्याइतकी राहील. ह्या ठाकरे घराण्यामुळे तुम्ही इतक्यावरती पोहोचले आहात. दसरा मेळावा मुंबईत घेऊ नका. तुमच्या दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे सुरतला जिकडे यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. सुरत किंवा गुहाटीला दसरा मेळावा घेऊ शकतात. त्यांच्या पक्षाचा जन्म तिकडे झाला आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे की ठाकरे; संजय राऊत जोरदार टीका करत म्हणाले…

मुख्यमंत्रिपदासाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते; CM Eknath Shinde यांचा Uddhav Thacakeray यांच्यावर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version