सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (शुक्रवार, ३० सप्टेंबर) जाहीर माफी मागितली. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसवर टीका करत, “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत आहे. परंतु, वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही तुम्ही माफी मागायला तयार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केला असून, ‘वीर सावरकर यांना अद्यापही भारत रत्न देऊन का सन्मानित केलं नाही? त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागावी,’ असे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान मोदींनी मागितलेल्या माफीवरून आज (शनिवार, ३१ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवरायांची कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. म्हणून ही राजकीय माफी आहे असे मी म्हणत आहे. प्रधानमंत्री यांना यात राजकारण आणायचा आहे. वीर सावरकर यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कदापि होऊ शकत नाही. वाटल्यास आम्ही प्रधानमंत्री यांना सावरकरांचं सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचायला पाठवू. सावरकर यांच्या विषयी पूर्णपणे वेगळा आहे. काँग्रेसने काय करायचं हा काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकर यांना अद्यापही भारत रत्न देऊन का सन्मानित केलं नाही? त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागावी,” असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी शिवरायांची माफी मागत ते म्हणाले, “जेव्हा २०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केले होते, तेव्हा मी रायगड किल्ल्यावर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या भावनेने आपल्या देवतेची पूजा करतो, त्याच भावनेने मला देशाची सेवा करायची आहे. सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले, ते माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही, ते फक्त एक राजा, महाराज नाहीत, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय दैवत आहेत. आज मी नमन करतो. माझे मस्तक आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी तुमच्या चरणी डोके ठेवून माफी मागतो.”
पालघरमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सावरकरांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आमची मूल्ये वेगळी आहेत. भारतमातेचे शूर सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करणारे आणि देशभक्तांच्या भावना चिरडणारे आम्ही नाही. वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही तुम्ही माफी मागायला तयार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा भारताची गणना जगातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. भारताच्या या समृद्धीचा एक मोठा आधार होता भारताची सागरी शक्ती… आपली ही शक्ती महाराष्ट्रापेक्षा चांगली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या प्रगतीसाठी काय निर्णय घेतले होते, हे कोणाला माहीत असेल.”
हे ही वाचा:
भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis
शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून