महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या राज्यातील शिंदे (Eknath shinde) फडणवीस (Devendra Fadnvis) सरकार विरोधात आज बंद (Mumbai Worli Bandh) करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत करणार आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबरला आंदोलन केलं जाणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.
हेही वाचा :
संजय राऊत म्हणाले, लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही असेही राऊत म्हणाले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. सरकार त्याचं समर्थन करते. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
“कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी(Maharashtra Karnataka Borderism) सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल. आम्ही फक्त या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत. आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे राऊत म्हणाले, तो सीमाभाग जोपर्यंत केंद्रशासित होत नाही, तोपर्यंत अत्याचार होतच राहतील. तरीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातलं असेल तर आम्हाला आनंद आहे. त्यांनी तत्काळ मराठी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि त्यांचा छळ थांबला पाहिजे. मराठी बोर्ड हटवणं, मराठी भाषेला शासकीय दरबारात विरोध करणं, मराठी फलकांवर कारवाई करणं, हे खेळ थांबले तरी त्या भागात शांतता नांदू शकते, असंही राऊतांनी नमूद केलं.