संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, फडणवीस मदारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादविवाद हे सुरु आहेत.

संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, फडणवीस मदारी…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादविवाद हे सुरु आहेत. अश्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे.

यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल हा केला आहे. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावला आहे. तर सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागतंय, अशीही टीका राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्री कुठे आहे असं विचारल्यास ते कायम दिल्लीत असल्याचं दिसत आहे. कधी अमित शहांशी रात्री 12 वाजता बैठक घेतात तर कधी जे पी नड्डांना भेटतात. मुख्यमंत्री स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे चेले म्हणवता आणि जे पी नड्डांच्या स्वागताचे बोर्ड लावता. ही लाचारी पत्करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवरआली आहे, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंची शिवसेना ही चॅयना मेड माल झाली आहे. ही राज्याची नाही तर ही चायनाची शिवसेना असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना फोडण्याची हिंम्मत अमित शहांमधेय नाही. ई़डी आणि सीबीआयने ही शिवसेना फोडली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

मुख्यमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न विचारल्यास ते कायम दिल्लीत दिसतात. इथे राज्यात बेसावध आरोग्य व्यवस्थेमुळे लोकांचे जीव चालले आहेत, हे दिल्लीत गेले आणि इथे सरकार कोण चालवणार? असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार ना देवेंद्र फडणवीसांनी आणलं आहे. ना अजित पवारांनी आणलं आहे आणि ना एकनाथ शिंदेंनी आणलं आहे. हे सरकार दिल्लीतून ईडी आणि सीबीआयने आणलं आहे. अजित पवार पळून जाण्याचं कारण शरद पवारांनी सांगितलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळून गेले आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही कोरोनाशी सामना केला. कोरोनाकाळातील राज्याचे मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेने उत्तम काम केल्याने जगाने आम्हाला मानांकन दिलं आहे. धारावी सारखा भाग मुंबईत असताना कोरोना रोखला आहे, असं बोलत त्यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका केली आहे.

हे ही वाचा: 

Asian Games 2023, टिळक वर्माने षटकारांचा वर्षाव करत पूर्ण केले अर्धशतक

Russia-Ukraine मध्ये वाद सुरूच, तब्ब्ल ५१ जणांचा मृत्यू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

सिक्कीममध्ये महापूर, ४८ तासांपासून नागरिक बोगद्यात अडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version