Mahavikas Aghadi Mahamorcha संजय राऊतांनी केला हल्लाबोल, सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल

आज महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सुरु आहे. आजच्या महामोर्चाला हजारो लोक एकवटले आहेत. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले आहेत. सकाळी १० वाजता भायखळ्यातून निघालेला हा मोर्चा दुपारी १ वाजता आझाद मैदानात पोहोचला.

Mahavikas Aghadi Mahamorcha  संजय राऊतांनी केला हल्लाबोल, सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल

Mahavikas Aghadi Mahamorcha  : आज महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सुरु आहे. आजच्या महामोर्चाला हजारो लोक एकवटले आहेत. या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले आहेत. सकाळी १० वाजता भायखळ्यातून निघालेला हा मोर्चा दुपारी १ वाजता आझाद मैदानात पोहोचला. या वेळेस हा मोर्चा आझाद मैदानात पोहोचला असून संजय राऊत यांनी जनतेला संबोधित केले आहे यावेळेस ते म्हणाले, आपण लढाईची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे सरकार हतबल झालं आहे. महाराष्ट्र एक झाला आहे हे सांगण्यासाठीच आपण एकत्रं आलो आहोत, असं सांगतानाच आपली आजची विराट शक्ती ही फक्त विराट शक्ती नाही. तर सरकार उलथवून लावण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे, अशी घोषणाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

महापुरुषांचा अपमान करुन कोणी सत्तेत बसू शकेल का? या सरकारला सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आज दिल्लीसुद्धा दुर्बीणीतून बघत असेल की, महाराष्ट्राराची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र (Maharashtra) जागा झालाय. पेटून उठलाय आज ठिकणी पडल्याचे राऊत म्हणाले.

आज महाराष्ट्र एका रंगात न्हाऊन निघाला आहे. या मोर्चात शिवसेनेचा झेंडा आहे. राष्ट्रवादीचा झेंडा आहे. काँग्रेसचा झेंडा आहे. डाव्यांचा झेंडा आहे. समाजवादी पार्टीचा झेंडा आहे आणि तिरंगा झेंडाही आहे. आपण एका रंगात न्हाऊन निघालो असून आता आपल्याला समोर दिसणारा रावण गाडायचा आहे, असं ते म्हणाले. रणनिती ठरली आहे. रणशिंग फुंकले आहे. शंख फुंकले आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली आहे. आता विचारांचे आणि एकतेचे वादळ घोंघावू लागले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आजच्या मोर्चात प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी सामील झाला असल्याचे संजय राऊत म्हणाले. आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सगळ्यात मोठा अपमान असल्याचे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता हे सरकार उलथून टाकण्याच्या संधीची वाट पाहत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात, गावागावात या सरकारच्या विरोधात रोष आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे.

व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. आमची रणणिती ठरली असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. युद्धासाठी ही फौज तयार झाली असल्याचे राऊ म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी आमच्या ताब्यात द्या. ते रोज महाराष्ट्राच्या बदनामी करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

 

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठरल्या ‘मविआ’च्या हल्लाबोल आंदोलनाचा ‘लक्षवेधी’ चेहरा

महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला आरंभ Mahavikas Aghadi Mahamorcha

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version