संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती राऊतांनी पत्रातून केली आहे. संभाजीनगर येथे झालेल्या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील भ्रष्टचाराचा मुद्दा उचलून धरलं आहोत.

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती राऊतांनी पत्रातून केली आहे. संभाजीनगर येथे झालेल्या सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील भ्रष्टचाराचा मुद्दा उचलून धरलं आहोत. त्याच मुद्द्याला अनुसरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पात्र लिहिलं. या पत्रातून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हा कधी दाखल होणार अशी विचारणा करण्यात अली आहे. त्याचबरोबर सरकारमधील बाजारबुणग्यांवर कारवाई कधी करणार? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी पत्रात आमदार राहुल कुल, दादा भुसे आणि किरीट सोमय्या यांचा उल्लेख केला आहे.

संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सरकारमधील अनेकांच्या बेकायदेशीर प्रकरणाबाबत पुरावे सादर करण्यासाठी मला आपली भेट हवी आहे , आणि त्यासाठी मी गेल्या चार महिन्यापासून प्रयत्न करत आहे.मात्र आपण भेट देण्यास टाळाटाळ करत आहे. असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरश: लुटमार झाली आहे. तेथील सहकारी कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. तरी देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुले मला या पात्रातून राहुल कुल यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.

त्याचबरोबर शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार दादा भुसे यांनी गिरण Agroच्या नावाने 178 कोटींचे 25 लाख रु. शेअर्स शेतकऱ्यांकडून जमा केले. गिरण कारखाना वाचवण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले आणि कंपनीच्या वेबसाईटवर फक्त एक कोटी 67 लाखांचे शेअर्स हे फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले आहेत.तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेतून पैसे जमा केले त्यासाठी लागणार हिशोब दिलेला नाही अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेले दरोडेखोरी थांबवावी. नि जनतेचा पैसा हा सत्कर्मी लागला पाहिजे. असे राऊत म्हणले. तर या सर्व बेकायदेशीर प्रकरणाबाबत माझ्याकडे जे पारवे आहेत ते मी सादर करण्यासाठी आपणास भेटू इच्छितो, तुम्ही आम्हला तुमच्या सोयीप्रमाणे वेळ कळवावी, असे संजय राऊत यांनी या पात्रातून मांडले आहे.

हे ही वाचा : 

Weightlifter Sanjita Chanu ला डोप चाचणीत अपयश, चार वर्षांची घातली बंदी

उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन फायदेकारक | Basil Seeds | Summer Season

Uddhav Thackeray PC Live, फडणवीस गृहमंत्री न्हवे गुंडमंत्री, तोबडतोब राजीनामा द्यावा, रोशनी शिंदे मारहाणीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version