महाराष्ट्र पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलने दिघा आणि ठाणे रेल्वे मार्गावरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. वैभव कदम असे हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. वैभव कदम हे मागील सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा दलात होते. अनंत करमुसे प्रकरणाबाबत वैभवचीही चौकशी करण्यात येत होती. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वैभव कदम यांच्या निधनाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आता या प्रकरणात मोहित कंबोज यांनी देखील उडी घेतली आहे.
मेरी बिनती है मुख्यमंत्री @mieknathshinde ji और उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से , तुरंत FIR दर्ज होनी चाहिए Vaibhav Kadam केस में , जो पुलिस वाले हमारी सुरक्षा करते है अगर वह सुरक्षित नहीं हैं या उनको न्याय नहीं मिले गा तो जनता का क्या ! pic.twitter.com/i7femL2dzb
— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) March 29, 2023
काय आहे अनंत करमुसे प्रकरण?
ठाण्यात राहणारे अनंत करमुसे यांनी तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मॉर्फ केलेले छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. अनंत करमुसे अपहरण आणि प्राणघातक हल्ला प्रकरणात जितेंद्र आव्हाडला अटक करण्यात आली होती. आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाण्यातील ४० वर्षीय अनंत करमुसे यांनी आरोप केला की ५ एप्रिल २०२० च्या रात्री काही पोलिस त्यांना आवाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
हे ही वाचा :
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी थेट पोहोचले संसदेत
पाणी जपून वापरा, मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणी कपात
प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली
Follow Us