श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Congress leader former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे.

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Congress leader former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे. शिवराज पाटील यांनी गीतेची तुलना जिहादशी केल्याने आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली. पाटील म्हणाले की, महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे. याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगत आहे. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, जिहादचा विषय तेव्हा येतो जेव्हा मनात स्वच्छ विचार असून देखील त्यापध्दतीचे काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील कोणी ते समजून घेत नसेल तर म्हटले जाते की शक्तीचा उपयोग करावा लागला तर तो केला पाहिजे. हे फक्त कुराणमध्ये सांगितलेले नाहीये. तर ते महाभारतात जो गीतेचा भाग आहे त्यामध्ये श्रीकृष्ण देखील अर्जुनाला जिहाद बद्दलच सांगतात, असे शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले आहेत.

शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं आहे. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत.

“मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे.” श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

माझ्याविरुद्ध निवडणुकीसाठी का होईना; सर्व राजकारणी एकत्र आले हे चांगलं आहे- संदीप पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version