काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामॊठी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांचे त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि अजित पवार यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींचा विरोधी पक्षांच्या ऐक्यावर परिणाम होणार नाही. या घडामोडींनंतर माझ्या वडिलांचा (शरद पवारांचा) कौल आणखी वाढेल. आमच्या पक्षाची विश्वासार्हताही आणखी वाढेल. अजित पवार यांचे विचार वेगळे असतील, पण मी माझ्या मोठ्या भावाशी कधीच भांडण करू शकत नाही आणि त्याच्यावर नेहमीच बहिणीसारखे प्रेम करीन. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध मिसळणार नाहीत.
पक्षाच्या जबाबदाऱ्यांबाबत सुप्रिया सुळे आता खूपच परिपक्व झाल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या आहेत की, २०१९ मध्ये जेव्हा अजित पवार पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पकालीन सरकारचा भाग बनले तेव्हा त्या पक्षाच्या जबाबदाऱ्यांबाबत खूपच परिपक्व झाल्या आहेत . सुळे यांची गेल्या महिन्यात पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे.
तसेच सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या आहेत की , पवारसाहेब एक गोष्ट दोन-तीन वेळा म्हणाले की, आम्ही या सगळ्यात अडकणार नाही, आम्ही थेट जनतेत जाऊ, जनतेशी बोलू. महाराष्ट्र आणि देशातील जनता ठरवेल.” २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे पाऊल उचलले आहे , असे ते म्हणाले. २०२४ बाबत भाजपमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…
Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध