spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अचानक सत्ता गेल्यामुळे ठाकारेगट बेभान, ठाकरे सांगोल्यात आल्यानंतर देणार टीकांचं उत्तर

अचानक सत्ता गेल्यामुळे ठाकारेगट बेभान झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या हितासाठी काम करतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि मंत्रिमंडळ दिवसरात्र काम करून लोकांना न्याय देत आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये नेहमीच चुरशीची लढाई पाहायला मिळते. नेहमी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. परंतु आज शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी मराठी वृत्तवाहिनी TV9 मराठीशी बोलताना ठाकरे गटावर टीका करतानाच उद्धव ठाकरे यांचं कौतुक देखील केलं आहे.

यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले,”अचानक सत्ता गेल्यामुळे ठाकारेगट बेभान झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या हितासाठी काम करतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि मंत्रिमंडळ दिवसरात्र काम करून लोकांना न्याय देत आहेत. टीका करणारी टोळी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला काम करणारी माणसं. पण उद्धव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे त्याला हात लावणार नाही, असं शहाजी बापू म्हणाले.

यापुढे शहाजी बापू पाटील यांनी पुढे, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येतील अशी परिस्थिती आज तरी नाही. त्यामुळे शिंदे गट भाजप बरोबरच युती करून पुढील निवडणुका लढवेल, असं स्पष्ट केलं आहे.पण भविष्यात जर दोन्ही गट एकत्र आलेच तर आनंदच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सध्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार या चर्चाना उधाण आले. त्या गोष्टीवरही शहाजी बापू यांनी आपलं मत मांडलं आहे. शहाजी बापू म्हणाले,”हि युती झाली तरी ती फार काळ टिकणार नाही. त्यांचं मनोमिलन होणार नाही. त्यामुळे ही युती जास्त काळ टिकणं शक्य नाही. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे जानेवारीमध्ये सांगोल्यात येणार आहेत, त्यावेळी सर्व टीकांची उत्तर देणार असल्याचंही स्पष्ट केलं.

त्यानंतर त्यांनी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावरही मत मांडलं.”छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज रक्षक होते त्याच बरोबर धर्मवीर देखील होते. औरंगजेबाने धर्मबदलण्यासाठी संभाजी महाराजांचा वध केला”,असं सहजी बापू यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलगी आणि पाकिस्तानी लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापरलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आहे तरी कोण?

उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण

नार्को टेस्टच्या मुद्यावर ठाकरे गट आक्रमक, नारायण राणेंवर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss