बेळगावमधील (Belgaum) हिरबागेवाडी (Hirbagewadi) टोलनाक्यावर (toll booth) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांवर (vehicles) हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महारष्ट्रामध्ये दिसून आले. राज्यातील बड्या नेत्यांनी कन्नड रक्षण वेदिका या संघटनेनं केलेल्या कृत्याचा जाहीर शब्दात निषेद केला आहे. ही मारहाण थांबवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४८ तासांचा कालावधी दिला आहे.
काल कोल्हापूरमधल्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्यांनी सुद्धा बेळगावमध्ये जाणायचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. तर पुण्यात सुद्धा काल ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून आलं. तर आज कर्नाटक राज्याविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता एमटीएनएल बिल्डिंग कम्पाऊंड, कर्नाटक बँकेचे मुख्य प्रवेशद्वार, पवई, मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन हिंदूराव देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन केलं. कर्नाटक बँकेवर मराठी माणसांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन या वेळी करण्यात आला.” असे नितीन हिंदूराव देशमुख यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बँकेच्या फलकाला काळा रंग सुद्धा मारण्यात आला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
हे ही वाचा :
कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?, बाळासाहेब थोरात