सध्या एअर बस सी २९५ चा वाद महाराष्ट्रामध्ये प्रचंड पेटला आहे. त्यात आज भारताचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सी-२९५ ची पायाभरणी गुजरातमध्ये करण्यात आली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आज देशात प्रथमच खाजगी क्षेत्राकडून विमान निर्मिती सुविधेची पायाभरणी करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी तसेच संपूर्ण देशासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या संरक्षण क्षेत्रातील प्रवासातील मैलाचा दगड ठरेल.
या प्लांटमध्ये तयार होणारे सी-२९५ विमान हे उच्च क्षमतेचे आणि जागतिक दर्जाचे अत्याधुनिक विमान असेल. यामुळे भारतीय हवाई दलाच्या लॉजिस्टिक क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. याआधी भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलत असताना, कोणीही ते गांभीर्याने घेत नव्हते. पण आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे संपूर्ण जग भारताचे ऐकत आहे. असे राजनाथ सिंग यांनी या वेळी सांगितले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपण भारताला जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. भारत आज स्वतःचे फायटर प्लेन, टँक, पाणबुडी बनवत आहे. एवढेच नाही तर भारतात बनवलेली औषधे आणि लस देखील जगातील लाखो लोकांचे प्राण वाचवत आहेत. आतापर्यंत फक्त सरकारलाच सर्व काही कळते अशी आपली मानसिकता होती. खासगी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले. यापूर्वीच्या सरकारांनी या समस्यांकडे दुर्लक्ष केले होते. अशा परिस्थितीत लॉजिस्टिक इत्यादी उत्पादनाकडे लक्ष दिले गेले नाही.
ते म्हणाले की, आगामी काळात भारताला २००० विमानांची (प्रवासी) गरज भासेल. आजचा कार्यक्रम त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता भारत वाहतूक विमानही बनवणार आहे. प्रवासी विमानेही बनवली जातील ज्यावर मेक इन इंडिया लिहिलेले असेल. येथे तयार होणारी वाहतूक विमाने केवळ आपल्या सैन्याला बळ देणार नाहीत तर ते आपल्या विमान निर्मितीसाठी एक नवीन परिसंस्था विकसित करेल. शिक्षण आणि संस्कृती म्हणून ओळखले जाणारे वडोदरा आता हवाई वाहतूक क्षेत्राचे केंद्र म्हणून नवीन ओळख निर्माण करेल.
हे ही वाचा :
ट्विटर होतोय #BoycottCadbury ट्रेंड ; काय आहे यामागील कारण
खडसें साहेबांना इतकं का माझ्या मर्दानगीचं वेड लागलं – शहाजीबापू पाटील