शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर भाष्य केले. नकली शिवसेनेला घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्याची सवय झाली आहे. त्यांचा घरात फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री आहे. आमचा महायुतीचा मुख्यमंत्री जनतेत फिरणारा, दुःख जाणून घेणारा आहे. मुख्यमंत्री जे करत आहेत ते राजकारणात आवश्यक आहे. काही जणांच्या मते घरात फेसबुकवर बोलणारा हवा. ते म्हणतात की, मुख्यमंत्री पैसे वाटतात. तर त्यांनी मला एक सांगावं मुस्लिम मतासाठी तुम्ही बॉम्बस्फोट मधील एका दहशतवाद्याला घेऊन फिरत आहेत. हे पाहून बाळासाहेबांना किती वेदना होत असतील? असा सवाल विचारत संजय राऊत बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा, अशा घणाघात यावेळी राजू वाघमारे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
नाशिक घोटाळा प्रश्नावर वाघमारे म्हणाले की, आम्ही नेहमी म्हणतो बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. आम्ही जसा बाप दाखवला आहे, खिचडी घोटाळ्याचा सूत्रधार कोण? कोणाच्या खिश्यात पैसे गेले? असा सवाल उपस्थित करत वर्षा गायकवाड यांना धारावीचे किती मुद्दे माहिती आहेत? धारावीतील परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली. स्वतःच्या वडिलांच्या कॉलेजमध्ये शिकवून कोणी प्रोफेसर होत नाही, असा टोला राजू वाघमारे यांनी वर्षा गायकवाड यांना लगावला. मुस्लिम समाज मतदार तिकडे वळतो. हा एक नरेटिव्ह सेट केले जात आहे. मुस्लिम समाजाला विकास नकोय का? मागील १० वर्षापासून किती कामे केली आहेत? आम्ही खऱ्या अर्थाने मुस्लिमांचा विकास करू शकतो, असा विश्वास राजू वाघमारे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘एक अकेला सब पे भारी’ बोलणारे सत्ता जाण्याच्या भीतीने… Sachin Sawant यांचा PM Modi यांना खोचक टोला
पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? Uddhav Thackeray यांचा PM Modi यांना सवाल
Follow Us