त्यांनी राजकारण करत राहावे, आम्ही फक्त….Ajit Pawar यांचे सोशल मीडियावर सूचक वक्तव्य

त्यांनी राजकारण करत राहावे, आम्ही फक्त….Ajit Pawar यांचे सोशल मीडियावर सूचक वक्तव्य

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. त्यांनी राजकारण करत राहावे, असे अजित पवार यांनी ट्विटमार्फत म्हटले आहे. याशिवाय आम्ही फक्त विकास करू, असा विश्वास अजित पवार यांनी पोस्ट करत व्यक्त केला आहे.

काय आहे अजित पवार यांचे ट्विट?

त्यांनी राजकारण करत राहावे.
आम्ही फक्त विकास करू.

जय महाराष्ट्र!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनत आहे. काल 6 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक ट्विट केले होते आणि त्याबाबत राजकीय विश्वात चर्चा रंगली होती. त्यानंतर आज 7 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकारणात पुन्हा नवीन चर्चांना उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बघून योजनेबाबत अजित पवार काय म्हणाले?

‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Exit mobile version