सत्य लपत नाही, काळानुसार सत्य समोर येतेच : केदार दिघेंचा हल्लाबोल

सध्या राज्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचे वाद हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सत्य लपत नाही, काळानुसार सत्य समोर येतेच : केदार दिघेंचा हल्लाबोल

सध्या राज्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचे वाद हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या दोघांमध्येही धनुष्यबाण या चिन्हावरुन सामना रंगताना दिसत आहे. आणि त्यातच संजय राऊत ( Sanjay Raut ) हे तुरुंगात आहे. परंतु शिवसेनेचे इतरही कार्यकर्ते व नेते मंडळी शिवसेनेचा किल्ला लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे ( Shiv Sena District Chief Kedar Dighe ) यांनी थेट मुखमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी एका ट्विट ( Tweet ) मार्फत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. त्या ट्विट मध्ये केदार दिघे म्हणाले आहेत, काहीजण म्हणतात आम्हीच खरे पण त्यावर काळ उत्तर देत असतो… सत्य लपत नाही. काळानुसार सत्य समोर येतेच.. जो चुकतो त्याला समाजच आरसा दाखवतो ! असे ट्विट केदार दिघे यांनी केले आहे. शिवसेना हि कुणाची मक्तेदारी नाही अश्या शब्दात केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना यापूर्वी सुनावलं होत. आता , एकनाथ शिंदेच्या भूमिकेवर टीका करताना केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेंना दाखवत शिवसेना असेल तरी त्याचा खरा आरसा हा भाजप असल्याचं म्हंटल आहे. निश्चित जनता त्यांना आरसा दाखवेल असेही त्यांनी ट्विटवरून म्हंटले आहे. या धनुष्यबाणाच्या सुरु असलेल्या लढाईवरूनदरम्यान केअर दिघे यांनी हे ट्विट केले. तसेच त्या ट्विटमधून कार्टूनच्या माध्यमातून टीका देखील केली आहे.

 

हे ही वाचा :-

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरु, आदित्य ठाकरेंचा सरकारला दणका

“पन्नास खोके एकदम ओक, आले रे आले गद्दार आले” राज्यसरकार विरुद्ध विरोधकांची घोषणा बाजी

Exit mobile version