शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहेत. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत कि, शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
“गेले ६ ते ७ महिने शिवसेनेचं काय होणार? पक्षनाव, चिन्ह मिळणार की नाही? पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचं काय होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेनं आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.