Uddhav Thackeray Live : पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाडटाकली होती. त्यानंतर राऊत यांची तब्बल 16 तास चौकशी केली. राऊत यांना ईडीने रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या अटकेचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडसाद उमटले आहे. यादरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, या प्रसंगी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेलं वक्तव्य निर्घृण आणि घृणास्पद आहे. आपण राजकारणाची तुलना बुद्धिबळाशी करतो. पण सध्याचं राजकारण केवळ बळाचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची, हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठी अमराठी राजकारण करून स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायचं, असे भाजपचे भेसूर कारस्थान जनतेसमोर आलेलं आहे.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 1, 2022
मुख्यमंत्री कोण?, उपमुख्यमंत्री कोण ? कळतही नाही, सेनेच्या फेवरेट पिचवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी
पुढे ठाकरे म्हणाले, “संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. त्याचा गुन्हा नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे मरण आले तरी शरण जाणार नाही हे त्यांचे वाक्य मला खूप आवडते. आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक कधी शरण जात नाही”. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. pic.twitter.com/17qqtSqksh
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 1, 2022
हेही वाचा :
ठाण्यावर गद्दारीचा शिक्का, दिघे साहेब घात झाला…; राजन विचारेंचे धर्मवीर यांना भावूक पत्र