spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या साक्षीने शिवद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केल्याशिवाय गप्प बसू नका: Uddhav Thackeray

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. याबाबत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या साक्षीने शिवद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केल्याशिवाय गप्प बसू नका, असे म्हंटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, “छत्रपतींता पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

जोडे मारो आंदोलनात कोणाचा सहभाग?

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

महायुतीकडूनही आंदोलनाची हाक

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या जोड्या मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात दादर परिसरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. वेडे वटवटराव, मुंग्या राऊत, करामती काका, पेंग्विन राव, नाना तळीराम अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss